Pages

Thursday, 5 February 2015

विदर्भाच्या भिमसैनिकाने मिळविला बाबासाहेंबाचा बंगला


विदर्भाच्या भिमसैनिकाने मिळविला बाबासाहेंबाचा बंगला


भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांच्या बंगल्यावर अतिक्रमण. हे ऐकूनच धक्‍का बसतो. होय हे खरे आहे. 54 वर्षांपूर्वी बाबासाहेब आंबेडकर यांच्या तळेगाव दाभोड येथील बंगल्यावर डिसोझा नावाच्या व्यक्‍तीने अतिक्रमण केले. त्यानंतर बाबसाहेंबाचे नावच त्या बंगल्यावरून मिटविल्या गेले. मात्र, बाबसाहेंबाचा हा बंगला शोधला विदर्भातील भिमसैनिक किसन थूल यांनी. आणि आठ वर्षे न्यायालयीन लढा लढून तो बंगला भीमराव रामजी आंबेडकरांच्या नावांवर केला. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पवित्र दिक्षाभूमिवर आले असता किसन थूल यांनी त्यांच्या लढयाचा इतिहास सांगितला.
किसन थूल. जिल्हा चंद्रपूर. तालुका वरोरा. रा.महाडोळी. व्यवसायाने शिक्षक. सध्या पुणे जिल्हयातील तेळगाव दाभाडे येथे कार्यरत. कोटयवधीचे भिमसैनिंकांचे प्रेरणास्थान असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकराचा 50 एकर शेती आणि बंगला येथेच. मात्र, त्याची कोणालाही माहिती नाही. बाबसाहेबांचा तो बंगला जर्रर झाला. त्यावर डिमेला डिसुझा या खिश्‍चन कुटूंबाचे अतिक्रमण. येथे बाबासाहेबांचा बंगला असल्याची माहिती किसन थूल मिळाली. त्यांच्यातील भीमसैनिक जागा झाला. येथून न्यायालयीन लढयाला सुरूवात झाली.
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अभ्यासाचे फार मोठे व्यासंगी होते हे सर्वांच नाही आहे. आपल्या समाजातील प्रत्येक घटकाला शिक्षण मिळावे याकरिता त्यांनी पिपल्स एज्युकेशन सोयासाटीची स्थापना केली. मुंबई आणि औरगांबाद येथे जगविख्यात महाविद्यालय आजही उभे आहेत. त्याचप्रमाणे पुणे परिसरात सुध्दा असेच महाविद्यालय व्हावे म्हणून त्यांनी मावळ तालुक्‍यातील तळेगाव दाभाडे येथे 26 नाव्हेंबर 1948 रोजी 37 एकर सहा आर. तसेच 6 नोव्हेंबर 1951 ला एकर पुन्हा 13 एकर जमिनी घेतल्याची कागदोपत्री नोंद आजही आहे. त्या गावामध्ये नयण्यरम्य ठिकाणी त्यांनी एक बंगला बांधला. मोठमोठया सभा गाजविल्यानंतर शांती मिळावी म्हणून तसेच अभ्यासासाठी ते या निवांतस्थानी असलेल्या बंगल्यामध्ये येत असत. मात्र, येथील बंगल्याची कल्पना इतरानांच काय तर त्यांच्या कुटूबिंयाना सुध्दा नव्हती. त्यामुळे 2004 पर्यंत तळेगाव दाभाडे येथे बाबासाहेबांचा बंगला आहे. याची पुसट कल्पना सुध्दा येथील ग्रामस्थांना नव्हती. चंद्रपूर जिल्हयातील किसन थूल येथे शिक्षक आहेत. किसन थूल यांची पत्नी माधुरी थूल यांना एका ग्रामस्थांकडून त्यांना बाबासाहेब आंबेडकरांचा येथे बंगला असल्याची माहिती मिळाली. ही माहिती त्यांनी पती किसन यांना सांगितली. त्यांनी किरण साळवे यांच्या मदतीने बंगला शोधला. शहा-ऍल्टोनो कॉलोनीमधील प्लाट क्रमांक 35 वर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या नावाने बंगल्याची नोंद आहे. ही नोंद 1956 ते 59 पर्यंच आहे. त्यांनतर ही जागा डिमेलो डिसुजा यांच्या मालकी झाली.बाबांसाहेबांचा बंगला मिळवायचाच, असा दृढनिश्‍चय किसन थूल यांनी केला. यानंतर 2004 पासून सर्व कागदपत्रे गोळा केली. 26 जानेवारी 2006 मध्ये त्यांनी 70 लोकांच्या उपस्थितीमध्ये पहिली बैठक घेतली. त्यानंतर किसन थूल यांनी आपल्या मित्रांच्या मदतीने स्मारक समितीची स्थापन केली. 2012 पर्यंत ते न्यायालयीन लढा लढले. अखेर सरकारला बाबासाहेंबाचा बंगला असल्याचे मान्य करावे आणि 26 एप्रिल 2012 रोजी हा बंगला अखेर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या नावावर करण्यात आला. हे निवास्थान स्मारक व्हावे म्हणून नगर परिषदेच्या ताब्यात देण्यात आला. आठ वर्षे न्यायालयीन लढाईत बाबासाहेब जिंकले. विदर्भातील खेडया गावातील किसन थूल या भीमसैनिकाने बाबासाहेंबाना त्यांचा बंगला मिळवून दिला. बाबासाहेंबांच्या स्मारकासाठी स्मारक समितीच्या अध्यक्षा ऍड. रंजनाताई भोसले, लिंबराज कांबळे, सहदेव डोंबे, तुकाराम मोरे, लक्ष्मण सोनवणे, श्रावण गायकवाड,देवानंद बनसोडे, गंगाधर सोनवणे, अंकुश मोरे, रविंद्र शिंदे, युवराज सोनकांबळे, माधुरी थूल,रोहिणी आव्होळ, प्रभाकर ओव्हाळ,सुरेश कांबळे, दिनेश गवई, विजय नाईक, बी.डी. गायकवाड हे प्रयत्नशिल आहेत.

""बाबासाहेबांचे स्मारक व्हावे, या बंगल्यामध्ये बाबसाहेबांच्या अनेक आठवणीची जपणूक करण्यात आली आहे. बाबासाहेंबाच्या बंगल्याची माहिती महाराष्ट्रात कुणालाही नाही. ही माहिती सर्वांना व्हावी म्हणून महाराष्ट्रात फिरत आहोत''
किसन थूल, सचिव
विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती 
-चंद्रशेखर महाजन
9850209710

No comments:

Post a Comment