Pages

Tuesday, 10 February 2015

18/1 च्या रात्रीचा चितापूरच्या निर्भयावरील निर्घृण अत्याचार !

18/1 च्या रात्रीचा चितापूरच्या निर्भयावरील निर्घृण अत्याचार !

रात्री 11.30 सुमार. थंडीची हुरहुळी भरल्याने गावखेड्‌यातील सर्व सातच्या आत घरात. तिच स्मशान शांतता चितापूर शिवारात. कुत्र्ये भुंकण्याचा आवाज. फार्म हाऊसचा दरवाजा उघडत काय झाले म्हणून रखवालदार बाहेर आले. अचानक किंचाळण्याचा आवाज. घरातील महिला बाहेर निघाली. पाच ते सहा लोकांचे टोळके नवऱ्यांवर हत्यावाराने वार करीत असल्याचे तिला दिसले. पाहताक्षणी तिच्यावरही त्यांनी हल्ला केला. ते सर्व दरोडेखोर घरात घुसले. गाढझोपेत असलेल्या "निर्भयावर'त्यांची वासनांध नजर गेली. आणि अर्धा तासामध्ये निर्भयाच्या शरीराचे लचके तोडून मानवी श्‍वापद निघून गेले. काही कळायाच्या आत 18/1 ची समाजाला काळीमा फासणारी घटना घडून गेली...
............................
दिल्लीतील निर्भयावर नराधमांनी अत्याचार केल्यानंतर सरकारने नराधमांना फासावर लटकविण्याची सरकार दरबारी चर्चा सुरू आहे. या चर्चेमुळे वासनांध श्‍वापद काही काळ तरी गप्प बसतील; या विचारात समाजमन आहे. मात्र, सर्व काही उलटी चक्रे फिरू लागली आहेत. कुही तालुक्‍यातील चितापूर शिवारातील घटना. मानवी श्‍वापदांच्या बेर्शमपणांच्या दुष्कार्माचा पाढा वाचणारी पुन्हा एक दुदैवी घटना घडली. चितापूर शिवारामध्ये बोरकर नावाच्या शेतकऱ्याचा फार्म हाऊस आहे. गावात रखवलादार मिळत नाही. सहकुटूंब दुसऱ्या गावावरून रखवालदार आणण्याचे काम सध्या परिसरात शेतकरी करीत आहेत. यातील बोरकर यांच्या फार्म हाऊसवर बाहेरगावून आलेले रखवालदार कुटूंबासह राहतात. 18/1 ची काळ रात्र त्यांच्या आयुष्यात कधीही न विसणारी आहे. गावखेड्‌यात लुटमारी, चोरी करणारी पाच ते सहा गुडांची टोळी अचानक त्यांच्या फार्म हाऊसवर येते. मोतीराम (बदललेले नाव.) कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज आल्यामुळे साखरझोपेत असलेले मोतीराम अचानक घराबाहेर आले. मात्र, त्यांना कुणीही दिसले नाही. फार्महाऊसच्या दरवाजासमोरून सर्वत्र नजर फिरविली. मात्र, त्यांना काळयाकुटट्‌ अंधारात काही दिसले नाही. अचानक पाठ फिरविल्यानंतर मोतीराम यांच्यावर काठयांनी हल्ला झाला. बेसावध असताना झालेल्या हल्ल्यामुळे ते किंचाळले. तरीही दरोडेखोरांचा मोतीराम यांच्यावर हल्ला सुरूच असतो. अचाकन पती का किंचाळतात म्हणून त्यांची पत्नी पार्वता(बदललेले नाव) घराबाहेर आली. तिच्यावर सुध्दा काठयांनी हल्ला करण्यात आला. तिच्या अंगावर असलेले दागिणे ओढण्याचा प्रयत्न दरोडेखोरांनी केला. अचानक झालेल्या हल्ल्याने काय करावे,हे सुध्दा दोघांनाही सूचत नव्हते. मात्र, जनावरांना बेदम मारावे, तसा मार ते सहाही दरोडेखोर मारीत होते. त्यांना बेदम मारल्यानंतर दरोडेखोरांनी आपला मोर्चा त्यांच्या घरातील लोकांकडे वळविला आणि इथेच घात झाला. घरात झोपलेल्या मुलांना उठवून दरोडेखोर त्यांना बदडवू लागले. तेवढयात त्यांनी नजर निर्भयावर पडली आणि त्यांच्या मनातील वासनांध श्‍वापद जीवंत झाला. काही कळयाच्या आतच सहा नराधन निर्भयावर तुटून पडले. निर्भयाने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सहा नराधमाला ती भारी पडू शकली नाही. शेवटी नराधनांनी निर्भयाचे जनावरासारखे लचके तोडले. तिच्यावर निर्घुण अत्याचार केला. फार्महाऊसमध्ये सुरू असलेला हा दरोडेरोखांराचा "नगा नाच' शेजाऱ्यांना कळण्याअगोदरचं ते पळून गेलेत.
रात्री उशीरा पोलिसांना माहिती दिली. पण, वेळेवर येथील ते पोलिस कसले. दरोडेखोर पळून गेल्यानंतर पोलिस आले.
निर्भयावर झालेला अत्याचार संपूर्ण मानव जातीला काळीमा फासणारा आहे. झोपेचे सोंग घेतलेल्या समाजव्यवस्थेला आणि प्रशासनाला महिलांवरील अत्याचार रोखण्याचा अपयश आले आहे. दिल्लीतील "निर्भया' नाही तर खेड्‌पाडयातील "निर्भया' आता सुरक्षित नाहीत. माणुसकी आता तळाला पोहोचली आहे. त्याऐवजी पैसा आणि संपत्तीने डोके वर काढले. यातून दरोडेखोरांचे बनोबल वाढत आहे. अत्याचार करणाऱ्या नराधमांनी हे पहिल्यादांच कृत्य केले असे नाही. त्याचे साक्षीदार अनेक आहेत. मात्र, जगासमोर उथळ माथ्यांनी फिरणाऱ्यांना समाजाला या अत्याचाराची लाज वाटत नाही.
गाव सोडून राहणारे मोतीराम रखवालदारांचे फक्‍त एक कुटूंब उध्द्‌वस्त झाले नाही. एका निभर्यांचे आयुष्य उद्‌ध्वस्त झाले नाही. समाजातील अनेक रखवालदार आणि निभर्याचे आयुष्य या घटनेने उद्‌ध्वस्त केले आहे.
महिलांना 50 टक्‍के आरक्षण देऊन चालणार नाही तर त्यांच्या विषयी प्रत्येकांच्या मनामध्ये असलेली वासनांध नजर मारून त्यांना आपली आई, बहिणी याचा दर्जा जोपर्यंत मिळत नाही. तोपर्यंत हे अत्याचार थांबणार नाहीत.
दिल्लीतील अत्याचार आता कुही तालुक्‍यातील चितापूर शिवारात पोहोचला आहे. चितापुरातील ही पहिलीच घटना नाही. खैरलांजी सारखे महिलांवर अत्याचार करणारे प्रकरण घडून सुध्दा प्रशासन यत्रंणा सुस्त आहें. त्याचे परिणाम आज दररोज होणाऱ्या महिलांवर होणाऱ्या अत्याचारावरून दिसून येत आहेत.
चितापूर येथील निर्भयावर अत्याचार झाल्यानंतर तिच्या आश्‍वस्त करण्यासाठी नेत्यांची रिघ लागली. पालकमंत्री शिवाजीराव मोघे गेले, अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी सात्वन केले. अर्थराज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी मुलींच्या आयुष्याचा सुव्यवस्थित करण्याचे आश्‍वासन दिले. राजानंद कावळे यांच्यासारखे गावातील अनेक नेतेही मदतीला धावून गेले. यातून असे पुन्हा प्रकार होणार नाहीत; याची शाश्‍वती मात्र कोणीही दिली नाही. एका निभर्यावर हा अत्याचार झाला नाही तर संपूर्ण महिला समाजावर झालेला हा अत्याचार आहे. फक्‍त त्यांची बळी पडली ती फक्‍त चितापूर येथील अल्पवयीन निर्भया...
पोलिस आरोपींना अटकही करतील. पण तिला न्याय केव्हा मिळेल हे सध्या कोणी सांगणार नाही. दिल्ली निर्भयावर झालेल्या अत्याचारांनतर संपूर्ण दिल्ली पेटली. गल्लीही त्याचे लोणे आले. पण चितापूरच्या निर्भयासाठी 40 किलोमिटर अंतरावरील उपराजधानीमध्ये साधी ठिणगीही पेटली नाही. दिल्लीतील निर्भया आणि चितापूरची निर्भया या दोन वेगवेगळया कशा राहू शकतात,असा प्रश्‍न उपस्थित होते आणि तो प्रश्‍न सर्वांनी अंतर्मुख करायला भाग पाडतो.
चितापूरच्या निभर्यासाठी फास्टट्रॅक कोर्टातून न्याय मिळाला पाहिजे. पुरूष आणि महिला समान आहे ते सांगणे आता दूर झाले. दिल्ली आणि चितापूरच्या निर्भया या समान आहेत हे सुध्दा सरकारने दाखवून दिले पाहिजे. तरच इंडिया आणि भारतातील रूंदावलेली दरी कमी होईल. असे झाले नाही तर भारतातील निर्भयावर अनेक अत्याचार होतील ते काळाच्या ओघात गळप होतील...
................................... 
 
चंद्रशेखर महाजन



No comments:

Post a Comment