|
14 एप्रिल 2015 रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांची जयंती उत्साह साजरी झाली. गावागावांमध्ये आपल्या लाडक्या आणि महाननेत्याला
कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लाेक जमले. त्यांनी पुष्पगुच्छ वाहून त्यांना आदरांजली
वाहीली. राज्य सरकारने बाबासाहेब आंबेकडर सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन केले. सप्ताहात
जिल्हास्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. आणि त्यांना आदरांजली वाहीली. मात्र,
ऐवढे सर्व असतानाही एक बाब मात्र, खटकली. केंद्रात कोणाची सत्ता असली तरी 14
एप्रिल रोजी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून बाबासाहेबांना अभिवादनपर जाहीरात सर्व
वर्तमापत्रात पहावयास मिळत होती. मात्र, यावर्षी केंद्र सरकारच्या वतीने एकाही
वृत्तपत्रात जाहीरात प्रकाशित झाली नाही. नागपूरच्या काही मुख्य वृत्तपत्रात केंद्र
सरकारची जाहीरात नव्हतीच.
बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना लिहिली. हे
सर्वांच नाही आहे. हे पुन्हा सांगण्याची गरज नाही. केंद्रात ते पहिले कायदामंत्री
होते. बलाढ्य असे शिक्षणतज्ज्ञ, कायदेतज्ज्ञ होते. तरीही केंद्राची त्यांना
आदरांजलीपर एकही जाहीरात नागपुरातील वृत्तपत्रात प्रकाशित झाली नाही. अशा महान
नेत्याच्या आदरांजलीपर जाहिराती वृत्तपत्रही दरवर्षी प्रकाशित करतात. मात्र,
यावर्षीच असे का झाले ते समजले नाही. मोदी सत्तेवर आल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांची पहिली जयंती, भाजपने साजरी केली. संघानेसुध्दा विशेषांक काढून त्यांना
आदरांजली वाहिली. मात्र, केंद्र सरकारने अभिवादनाची साधी ओळही माध्यमांना दिली
नाही. दिली असेल तर नागपुरातील मुख्य वृत्तपत्रात ती उमटली नाही. दोघांपैकी एक
नक्कीच खोटारडला आहे. तो आंबेडकरविरोधी आहे. दुसरी बाजू ही की, वृत्तपत्रामध्ये
राज्य सरकारने सात दिवस समता सप्ताहाच्या दिलेल्या सर्व जाहीरात प्रकाशित झाल्या. माध्यमाने त्या
चांगल्या उमटविल्या सुध्दा. म्हणजेच यावर्षी केंद्र सरकारच्या माध्यम विभागाने
वृत्तपत्रांना अभिवादनपर किंवा आदरांजलीपर जाहीराती दिल्या नाही, असा यातून सूर
निघतो. सरकारच्या लक्षात आले नाही, असे असू शकत नाही. हा जाणून बुजून केलेला प्रकार
आहे. कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आंबेडकरविरोधी असल्याचे सांगण्यासाठीच
सरकारच्या माध्यमविभागाने अशा जाहिराती दिल्या नाही, असाही सूर अाहे.
नरेंद्र माेदी पंतप्रधान झाल्यापासून ते मागासविराेधीत आहेत, हे सांगीतल्या जाते. अनेकदा त्यांच्या कृतीत ते लक्षातही येते. नुकताच देशाचा अथ्ार्ा संकल्प जाहीर झाला. ३२ हजार काेटी रुपयांच्या निधीची कपात अादिवासी व मागासवर्गीच्या याेजनांमधून केली. या समाज घटकाला मुख्य प्रवाहात अाणण्यासाठी माेठ्या निधीची गरज अाहे. काॅँग्रेस सरकारनेही त्यात माेठी वाढ केली असे नाही. मात्र, त्यांनी कपात केली नाही हे गेल्या १० वर्षातील चित्र. माेदींना विकासाच्या नावाने सत्तेवर बसविले. यामुळे सर्व घटकाचा विचार करून माेठा निधी उपलब्ध्ा करून नव्या विकास याेजना राबवतील असा आशावाद हाेता. मात्र, त्यांनी ३२ हजार काेटीच्या विकास निधीची कपात केली. यामुळे त्याचा मागासवर्गाबाबतीतील दृष्टीकाेन दिसून येताे. महाराष्ट्रातील इंदूमिलचा प्रश्न मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून मार्गी लागला. लंडन येथील स्मारकाचा प्रश्न मार्गी लागताेय. यामुळे थाेडी प्रतीमा सुधारण्याचा प्रयत्न हाेताेय. मात्र, यातून ते बाबासाहेब विराेधी नाहीत, हे स्पष्ट हाेत नाही. माेदी पंतप्रधान झाल्यानंतर त्याच दरम्यान दिल्ली येथील बाबासाहेब संशाेधन केंद्राचा प्रश्न समाेर आला. त्याच वेळी माेदी यांनी सरकार यापुढे स्मारकाबाबतील लक्ष देणार नाही. असे स्मारकासाठी निधी देणार नाही, असे जाहीर केले. देशात अनूसूचित जातीवर अन्याय हाेत असतानाही त्यांच्या संरक्षणासंदर्भात ते ब्र ही काढत नाहीत.
१४ एप्रील २०१५ राेजी बाबासाहेबांची जयंती साजरी झाली. दरम्यान ते उपस्िथत नव्हते. तसेच लहान माेठ्या कार्यक्रमांची पान भरून वर्तमान जाहीरात देणारे केंद्र सरकाने बाबासाहेबांच्या अभ्िावानदाची जाहीरात दिली नाही. प्रश्न जाहीरात का दिली असा नाही. जाहीरात दिल्यामुळे बाबासाहेब महान हाेतील, असेही नाही. ते महान आहेत. यासाठी जाहीरात दिली गरज नाही. मात्र, अशा नेत्यांना आठवण म्हणून तसेच त्याचे कार्य लाेकांपर्यत पाेहाेचविण्याठी अशा माध्यमाची गरज असते. तेच माेदी सरकारने केले नाही. महाराष्ट्रात असे प्रकार हाेत असले तरी येथील चळवळीत काम करणा-यांच्या लाॅबीमुळे. यातून मतपेढी हा तेवढा उदृदेश आहे. राेज एक हजार कायदे बलविणारे हे सरकार आहे. यामुळे यांच्याकडून फारशा अपेक्षा ठेवू नये. मात्र, चूक दिसेल तर ते बाेलेले पाहीजे, असे मला वाढते. कदाचित देशातील इतर राज्यातील काही वृत्तपत्रात दिसल्या असतीलही पण नागपूरातील मुख्य वृत्तपत्रात जाहीरातील दिसल्या नाहीत, त्यासाठी हा प्रपंच. म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरविराेधी काेण?, असा प्रश्न उपस्थित केला.
चंद्रशेखर महाजन
9850209710 |
|
No comments:
Post a Comment