Pages

Friday, 17 April 2015

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ कधी संपणार नाही

अांबेडकरी चळवळीविष्‍ायी प्रस्‍थ्‍ाापित नेत्‍यांमध्ये नेहमी नकाराची भ्‍ाूमिका राहीली आहे. आधी राजकारण,यातून सत्‍ता नंतर चळवळ अशी उलट दिशा राहीली आहे. त्‍याचे परिणामही आपल्‍याला दिसत आहेत. जाहीर भाष्‍ाणात किंवा सार्वजनिक ठिकाणी हे प्रस्‍थ्‍ाापित नेते चळवळ संपल्‍याचे जाहीर करतात. यांना ऐवेढही समजत नाही की, संपलेल्‍या व्यक्‍ती किंवा संघटनेच्या मागे काेणीही उभ्‍ाा राहत नाही. म्‍हणून त्‍यांना कार्यकर्ते किंवा युवक संघटनेसाठी येत नाही. त्‍यांच्या मधील ही नकारघंटा चळवळ संथ करण्यास जबाबदार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ कधी संपणार नाही. त्‍याचे शिलेदार बदलतील. काही काळात ही चळवळ संथ झाली हे मान्य करावे लागेल. मात्र, जाहीर भाषणात चळवळ संपली असे जाहीर करण्याऐवढी चळवळ मागे गेलेली नाही. त्‍याचे उदारहण भरपूर देता येईल. माझा फायदा झाला नाही किंवा सत्‍तेत वाटा मिळाला नाही म्‍हणून चळवळ संपली म्‍हणणा-यांची संख्या अधीक आहे.युवा पिढीला सत्‍ता आवडते.मात्र, ती आधी चळवळ, त्‍यातून राजकारण नंतर सत्‍ता अशा प्रकारच्या माध्यतातून. चळवळ म्‍हणजे फक्‍त रस्‍त्‍यावर येवून आंदाेलन करण्यापूरती नव्हेतर ती शिक्षण,धम्‍म, बाौध्द विचार व प्रसार, त्‍याची माध्यमे, समाजकारण याही पेक्षा अधीक व्यापक. युवा पिढीला नियाेजनबध्द चळवळ हवी आहे. फक्‍त १४ एप्रीलला भाष्‍ाण देण्यापूरती नव्हे. काही युवकांनी मते जाणून घेतली तेव्हा ब-याच बाबी समाोर आल्‍या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ अगोदरपेक्षा अधिक प्रखर झाली आहे. ती प्रत्येकांच्या मनामनात ठासून भरलेली आहे. त्यांच्या नावावर उभ्या झालेल्या संघटनांमध्ये मात्र, फाटाफुट आहे. याबाबात आंबेडकरी तरूणांनी चिड व्यक्‍त केली. नेत्यांनी व्यक्‍तीगत स्वार्थ सोडावा, समाजाचा स्वार्थ अंगीकारावा असेही आवाहन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा, असे आवाहन केले होते. त्यानुसार सामाजिक व राजकीय क्षेत्रात विविध संघटना स्थापन झाल्या. त्या संघटनांबाबत आंबेडकरी तरूणांचे प्रतिक्रीया जाणून घेतल्या असता बहुतेकांनी संघटनांचा उल्लेख नेत्यांच्या दुकानदा-या असा केला. आणि फाटाफुटीबाबत चिड व्यक्‍त केली. सोबतच बाबासाहेबांची चळवळ संपली नाही, ती जिवंत आहे, असेही ठाम विधान केले.
यासंदर्भात शेकडो तरूणांची मते जाणून घेतली त्यापैकी काहींच्या निवडक प्रतिक्रीया खालील प्रमाणे आहे.
बाबासाहेबांनी भारतीयांच्या कल्याणासाठी केलेले कार्य अद्वितीय आहे. पण, त्यांच्यानंतर चळवळीची दुरवस्था झाली आहे. त्याला नेते जबाबदार आहेत. दुरदुष्टी अभावी चळवळ भरकटली आहे. ऐवढेच नव्हे तर नेत्यांचा स्वार्थ या चळवळीच्या प्रगतीला आड येत आहे. आंबेडकरी जनतेसोबत नेत्यांनी केलेला विश्‍वास घात आता लोकांच्या लक्षात आला आहे. यामुळे नेत्यांची दुकानदारी बंद करणे आणि निकोप युवा कार्यकर्ते निर्माण आवश्‍यक आहे, अशी प्रतिक्रीया चंद्रपूर जिल्हयात मासळ येथील प्रा. नरेंद्र मेश्राम यांनी दिली.
तर नागपूरच्या न्यू कैलाश नगर येथील अजित नगरकर हा युवक म्हणाला, बाबासाहेबांची चळवळी संपली अशी जी ओरड होत आहे. ते मुळातच चुकीची आहे. नेत्यांची दुकानदारी धोक्‍यात आल्याने असा भ्रामक प्रचार केला जात आहे. चळवळ जीवंत आहे. प्रत्येकांच्या नसानसात आहे. बाबासाहेबांच्या या चळवळीमध्ये युवक हिरहिरीने भाग घेताना दिसून येत आहे. चळवळीच्या प्रचाराची व्याप्ती बदललेली आहे. यामुळे नेत्यांची कुचंबणा होत आहे. यातून असा भ्रामक विचार समाजात पेरत आहे. अशा नेत्यांपासून सावध राहणे गरजेचे आहे, असे त्याने सूचित केले.
शताब्दीनगर येथील मृणाल वाचनेकर म्हणाली, नेत्यांना किंवा संघटनांना दोषी ठरविण्यापेक्षा प्रत्येकांनी स्वतःला तपासले पाहीजे. कारण संघटना किंवा पक्ष हे लोकच चालवितात. यामुळे लोकांनी फक्‍त एक किंवा दोन नेत्यांना दोषी ठरविणे योग्य नाही. बाबासाहेबांची चळवळीला ख-या अर्थाने जोम आला आहे. फक्‍त समाजपुरती असलेली चळवळी आता सर्वस्तरामध्ये जात आहे. फक्‍त त्याचे नेतृत्व बदलेले आहे. हाच आपल्या समाजाचा दोष आहे.
तर अमरावती येथील राहूल वानखेडे म्हणाले, बाबासाहेबांच्या चळवळीला दिशा देण्याची जबाबदारी आता युवकावर आली आहे. युवकाने ही जबाबदारी खांद्यावर घ्यावी. संघटना आणि नेत्यांच्या मागे न धावताला स्वतः ऍजेंडा तयार केला पाहीजे. फेसबुक आणि तर माध्यम आहेत. त्याचा चळवळीसाठी वापर केला तर चळवळीला चांगले दिवस येतील, अशी आशाही त्याने व्यक्‍त केली.
चंद्रशेखर महाजन
माे.९८५०२०९७१०

No comments:

Post a Comment